पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांसोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजण्यावर आपल्या सरकारचा भर राहणार आहे.
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी जलसंधारणाच्या सर्व उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी जल युक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे.
पहिल्या वर्षी ५ हजार गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ केली जाईल.
अधिक माहितीसाठी:
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...
ASHOK_KESHAV_PRADHAN 7 years 11 months ago
------- इसी लिए हमें हमारे विचार एव बर्ताव बदलने होगे, भूमिको हमारी रिज़र्व बैंक समज़नि होगी, वर्षा के हर बून्द को सुवर्ण समजकर भूमिजल बैंक में जमा करना होगा। इसी सन्दर्भ मै एक नाराभी प्रस्तावित (suggest) करना चहताहु जिसे मेरी स्मरण शक्ति अनुसार मुंबई महापालिकेने सन १९५० के दशकमें जनजागृतिकेलिये बनाएहुवे हेण्डबिल पर छपा था – "जल हि जीवन है, पानी बेकार मत बहाओ " जो अपने समयमें काफी असरकारक साबित हुवाथा। ---------