पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांसोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजण्यावर आपल्या सरकारचा भर राहणार आहे.
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी जलसंधारणाच्या सर्व उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी जल युक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे.
पहिल्या वर्षी ५ हजार गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ केली जाईल.
अधिक माहितीसाठी:
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...
ASHOK_KESHAV_PRADHAN 7 years 11 months ago
-------- मै खुद्द यह मानताहूँ की “पानी राष्ट्रिय संपत्ति है, उसका अपव्यय रोकना ही चाहिये” और हम जानते हि है की पानीके बून्द बून्द से सरोवर बनता है । हाँ अब समय अनुसार उसमें और एक पांगती बढाकर हम उसे अपना घोष वाक्य बनाएं तो सही होगा "जल हि जीवन है, पानी बेकार मत बहाओ।भूमिको जलबैंक बनाकर अपनीही समृद्धि बढ़ाओ।" आओ हम सब मिलकर इसे इक राष्ट्रीय जनआंदोलन का रूप देनेकी कोशिश करे। --- धन्यवाद