आपला भविष्यकाळ डिजिटल असणार आहे. 21 व्या शतकातील नागरिक तंत्रज्ञानाप्रती अधिकाधीक सजग होत असताना महाराष्ट्र शासनही नागरिकांना प्रदान करावयाच्या सेवा आणि प्रशासन यात आमूलाग्र बदल घडवू इच्छिते.
महाराष्ट्र शासन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत नागरिकांना प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्याबरोबरच प्रशासन व्यवस्थेत पारदर्शकता आणू इच्छिते.
हे उद्दिष्ट साध्य करत एक आदर्श डिजिटल राज्य म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या सूचना मागवित आहे, ज्यायोगे नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करता येतील आणि महाराष्ट्र शासन आपल्या कृतीच्या माध्यमातून इतर राज्यांसाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरू शकेल
vidyadhar1961@gmail.com 8 years 9 hours ago
unless internet connection without disturbance how it possible .