युवक हे या देशाचे भविष्य आहेत. राष्ट्राच्या उभारणीत या युवा शक्तीचा विधायक सहभाग राहणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी भांडवल उपलब्धता या सर्वांची खात्री युवकांना द्यायची आहे. महाराष्ट्रातील युवक भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम असावयास हवा.
शासनाने युवकांना राज्याच्या विकासात कसे सहभागी करून घ्यावे या संदर्भातील आपल्या सूचना अवश्य कळवा.
techwithravi@gmail.com 7 years 12 months ago
काही दिवसान पूर्वी नागपूर च्या RBI चौक ला लोकांना उन्हे पासून वाचवण्या करिता ग्रीन नेट चा प्रयोग केला गेला होता तो कौतुकास्पद होता पण जर त्या एवजी महाराष्ट्र सरकार ने आपल्या नवीकरणीय उर्जा योजना अंतर्गत मोठ्या RBI सारख्या चौक ला शहीद गोवारी उडान पूल वर solar panel लावले तर वीज निर्माण तर होईलच त्या सोबत नाविनिकार्नीय उर्जेचे भारताने ठेवले ले लक्ष्य लवकर पूर्ण होईल आणि solar फार्म साठी जाणारी शेकडो एकर शेत जमीन वाचेल आणि लोकांना सावली लाभेल धन्यवाद