पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांसोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजण्यावर आपल्या सरकारचा भर राहणार आहे.
पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी जलसंधारणाच्या सर्व उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यासाठी जल युक्त शिवार अभियानांतर्गत नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे.
पहिल्या वर्षी ५ हजार गावे टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीतजास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ केली जाईल.
अधिक माहितीसाठी:
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Engl...
jchandras2963@gmail.com 7 years 12 months ago
मा. मुख्यमंत्री साहेब नमस्कार,दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी विविध उपाययोजना अापण करित आहात याबद्दल आपले व सर्व मंत्रिमंडळाचे आभार.
गावपातळीवरिल आपली सर्व यंत्रणा चांगली कार्यरत आहे. परंतु कर्मचाऱी कमी व अधिकारी संख्या जास्त झालेली आहे. व कर्मचारी कमी पडत आहेत.काम करणारा एकच व त्यावर लक्षठेवणारे 6-7अधिकारी अशी परिस्थिती आहे.उदा कृषि विभागात कृषि सहाय्यक -कृषि पर्यवेक्षक-मंडल कृषि अधिकारी -तालुका.प्त्येरक विभागात त्रिस्तरीय रचना आणणे अनिवार्य आहे.गाव-मंडल-तालुका असा क्रम आवश्यक आहे.